ताज्या बातम्या

विद्युत तारेचे शॉर्ट सर्किट होऊन ४ एकर जळाला.


अक्कलकोट प्रतिनिधी :- अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील शेतकरी निंगप्पा बादोले आणि अझर अष्टेकर यांच्या शेतातील 3.30 एकर उभा ऊस सकाळी 11 वाजता विद्युत रोहित्रच्या स्पार्कमुळे पूर्ण जळून गेला.

निसर्गाची अनियमितता आणि त्यात स्पार्कमुळे ऊस पूर्ण जळल्यामुळे हाता हाता तोंडाशी आलेले घास हिरावून घेण्याचे संकट दोन्ही शेतकऱ्यांवर आली आहे. यात तब्बल 5 लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोबत शेतकऱ्यांचे पिव्हीसी पाईप आणि इतर शेती आवजाराचे सुद्धा नुकसान झाले आहे. हवालदिल गरीब शेतकऱ्यावर मेहरबान सरकारने मदत करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. तसेच जळलेल्या उसाचा पंचनामा करून कारखान्यानी गाळपसाठी घेऊन सहकार्य करण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button